Sunday 22 January 2017

नाती

 ||   आई- वडील  ||🌹
*सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर.

       🌹 || गुरुजन ||🌹
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत.

  🌹 || आजी - आजोबा ||🌹
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.

      🌹 || सासू - सासरे ||🌹
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.

   🌹|| काका - मावशी 🌹
आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी.

       🌹|| आत्या - मामा ||🌹
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.

             🌹|| मामा 🌹
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.

            🌹|| मामी 🌹
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.

           🌹|| दाजी 🌹
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.

         🌹 || बहिण ||🌹
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका, कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका.

           🌹|| भाऊ ||🌹
आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.

           🌹||  साडु 🌹
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ.

        🌹 || मेहुणी ||🌹
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.

  🌹|| मावस भाऊ - बहीण 🌹
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.

  🌹|| मेव्हणा भाऊ - बहीण ||🌹
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.

     🌹|| भाचे - भाची ||🌹
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.

          🌹|| पुत्र ||🌹
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी.

       🌹 || मुलगी  ||🌹
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.

         🌹 || नातवंडे ||🌹
 दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.

          🌹 || मित्र मैत्री ||🌹
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला,  स्वतःचेच प्रतिरुप.

       🌹 || शेजार धर्म ||🌹
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या  सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.

       🌹|| शिष्य ||🌹
आपल्या कर्तृत्वाचा कळस व
आपल्या कौशल्याची किरणं.

खरंच .... माणुस नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा  माणुस .  
 नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?

Monday 16 January 2017

पालेभाज्यांचे औषधी उपयोग

१.]   कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.

२.]   कढीलिंब ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.

३.]   पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.

४.]  माठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.

५.]  चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.

६.]   हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 

७.]   अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.

८.]  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.

९.]  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे.

१0.]  मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.

१४.]    शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.

१५.]    शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

 (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

 किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
      किडनी स्टोन पासुन मुक्त होणारा हा उपाय कुपया जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा.

The Habit of Winning

" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते .

गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले .

अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात पाना घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले .

आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . "

त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग.

संदर्भ : The Habit of Winning

Saturday 14 January 2017

स्वस्तिक

卐卐卐卐卐卐卐卐卐卐
आपणास स्वस्तिक या शुभ
चिन्हाबाबत शास्त्रोक्त माहिती
देत आहोत. तुम्ही पण जाणा दुसर्यास पण पाठवा...

卐卐卐卐卐卐卐卐卐卐

🌰 स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ 'कल्याण असो' असा आहे. स्वस्तिक मध्ये  सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णु, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. 

卐卐卐卐卐卐卐卐卐卐

🌰 शांती,समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक . कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे.

卐卐卐卐卐卐卐卐卐卐

🌰 स्वस्तिक गतीचे द्योतक आहे.त्याचे चार  बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णुंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात.
卐卐卐卐卐卐卐卐卐卐

 🌰 स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास , प्रिती, सौंदर्य, आशिर्वाद, कल्याण, शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत.

卐卐卐卐卐卐卐卐卐卐

🌰 स्वस्तिकाची आडवी रेघ म्हणजे विश्वाचा विस्तार, आणि उभी रेघ म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे  कारण. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णुंचे नाभिकमळ असून  श्री ब्रम्हाचे उत्त्पत्तीस्थानआहे.

卐卐卐卐卐卐卐卐卐卐

🌰देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे. भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतिक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य, सर्व दिशांचा सौरभ, मानवी पुरूषार्थाचे प्रेरणाबळ, निर्मितीच्या सहाय्याची  सूचना आणि देश,काळ यांचे मिलन आहे. अश्या विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या शुभचिन्हास नमस्कार..

Friday 13 January 2017

who is packing your parachute?

Air Commodore Vishal was a Jet Pilot. In a combat mission his fighter plane was destroyed by a missile. He however ejected himself and parachuted safely. He won acclaims and appreciations from many.

After five years one day he was sitting with his wife in a restaurant. A man from another table came to him and said "You're Captain Vishal ! You flew jet fighters. You were shot down!"

"How in the world did you know that?" asked Vishal.

"I packed your parachute," the man smiled and replied.
Vishal gasped in surprise and gratitude and thought if parachute hadn't worked, I wouldn’t be here today.

 Vishal couldn't sleep that night, thinking about that man. He wondered how many times I might have seen him and not even said 'Good morning, how are you?' or anything because, he was a fighter pilot and that person was just a safety worker"

So friends, who is packing your parachute?
Everyone has someone who provides what they need to make it through the day.

We need many kinds of parachutes when our plane is shot down – we need the physical parachute, the mental parachute, the emotional parachute, the spiritual parachute & the Financial Parachute.We call on all these supports before reaching safety.Sometimes in the daily challenges that life gives us, we miss what is really important.

We may fail to say hello, please, or thank you, congratulate someone on something wonderful that has happened to them, give a compliment, or just do something nice for no reason.

As you go through this week, this month, this year, recognize the people who pack your parachute.

😊 I just want to THANK 🙏 Everyone who Packed  my parachute this year in  2016 one way or the other - through your words, deeds, prayers.  Cheers For 2017....

Thursday 12 January 2017

ATTACHMENT and DETACHMENT

A man who has gone out of his town comes back and finds that his house is on fire.

It was one of the most beautiful houses in the town, and the man loved the house the most! Many people were ready to give double price for the house, but he had never agreed for any price and now it is just burning before his eyes.

And thousands of people have gathered, but nothing can be done, the fire has spread so far that even if you try to put it out, nothing will be saved. So he becomes very sad.

His son comes running and whispers something in his ear:

"Don't be worried. I sold it yesterday and at a very good price ― three times. The offer was so good I could not wait for you. Forgive me."

Father said, "thank God, it's not ours now!"  Then the father is relaxed and became a silent watcher, just like 1000s of other watchers.

Please think about it! Just a moment before he was not a watcher, he was attached. It is the same house....the same fire.... everything is the same...but now he is not concerned. In fact started enjoying it just as everybody else in the crowd.

Then the second son comes running, and he says to the father, "What are you doing? You are smiling ― and the house is on fire?" The father said, "Don't you know, your brother has sold it."
He said, "we have taken only advance amount, not settled fully. I doubt now that the man is going to purchase it now."

Again, everything changes!!

Tears which had disappeared, have come back to the father's eyes, his smile is no more there, his heart is beating fast. The 'watcher' is gone. He is again attached.

And then the third son comes, and he says, "That man is a man of his word. I have just come from him. He said, 'It doesn't matter whether the house is burnt or not, it is mine.
And I am going to pay the price that I have settled for. Neither you knew, nor I knew that the house would catch on fire.'"

Again the joy is back and family became 'watchers'! The attachment is no more there.

Actually nothing is changing!

just the feeling that "I am the owner! I am not the owner of the house!" makes the whole difference.

This simple methodology of watching the mind, that you have nothing to do with it..Everything starts with a Thought !

Most of the thoughts are not yours but from your parents, your teachers, your friends, the books, the movies, the television, the newspapers. Just count how many thoughts are your own, and you will be surprised that not a single thought is your own. All are from other sources, all are borrowed ― either dumped by others on you, or foolishly dumped by yourself upon yourself, but nothing is yours.

Sow a thought, you reap an action.
Sow an act, you reap a habit.
Sow a habit, you reap a character.
Sow a character, you reap a destiny..! 🙏🏽

Jalaluddin Rumi

What Is Poison ? ? ?
He Replied With A Beautiful Answer - AnyThing Which Is More Than Our Necessity Is Poison. It May Be Power, Wealth, Hunger, Ego, Greed, Laziness, Love, Ambition, Hate Or AnyThing.

What Is Fear ? ? ?
Non Acceptance Of Uncertainty.
If We Accept That Uncertainty, It Becomes Adventure.

What Is Envy ?
Non Acceptance Of Good In Others, If We Accept That Good, It Becomes Inspiration.

What Is Anger ? ? ?
Non Acceptance Of Things Which Are Beyond Our Control.
If We Accept, It Becomes Tolerance.

What Is Hatred ? ? ?
Non Acceptance Of Person As He Is. If We Accept Person Unconditionally, It Becomes Love.

Monday 9 January 2017

टीम (TEAM) म्हणजे नक्की काय?

A business man gets stranded in a lonely highway in the US. The tyres of his car get stuck badly in a mud pool. He looks around for help and finally finds an old farmer. This businessman goes to him asking for help to get his car out of the mud. Farmer gauges the situation, and agrees to help him and says, let us take the help of warwick. Warwick was an old bull around, but the helpless business man agrees.

The farmer ties the bull to the car and start shouting loudly,’ FRED, PULL!.. JACK, PULL!.. JOHN, PULL... WARWICK, PULL’. As the farmer keeps shouting these words, the bull Warwick gets the car out of the pool of mud. Businessman is relieved but has a doubt in his mind. He thanks the farmer and asks him,’ you said the bull’s name was Warwick, and he was alone, then who were these Fred, Jack & John?’ Farmer coolly answered, "See, Warwick is old and is also blind. He does not know he is pulling this car alone. The moment he hears the other names, he thinks he is in a team, and he gives his best".

MORAL:  So is the case with all of us. The very thought that there are people to help us blesses us with a great deal of comfort, hope, confidence and enthuses us to put our heart and soul into any task that we undertake. Indeed, greatest civilizations have always been built on the foundations of a greater level of cooperation from their citizens, and the smartest animals we know — apes, elephants, wolves, dolphins, and crows — tend to live together in cooperative groups and work together for survival. As H.E.Luccock said, “No one can whistle a symphony. It takes an orchestra to play it.”  It's not without reason that the very word TEAM is said to stand for "Together  Everyone Achieves More".



एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता. रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली. कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली. शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल!’
‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला खायला घालेन!’ तो उद्योगपती म्हणाला.
आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले. त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले
‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’
त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली. उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबूवा उत्तरले
‘ त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामूळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’
एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्याो शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला.
TEAM या शब्दाचा अर्थ
T = Together
E = Everyone
A = Achieves
M = More

50 most positive one liners

1. Have a firm handshake.
2. Look people in the eye.
3. Sing in the shower.
4. Own a great stereo system.
5. If in a fight, hit first, and hit hard.
6. Keep secrets.
7. Never give up on anybody. Miracles happen everyday.
8. Always accept an outstretched hand.
9. Be brave. Even if you are not, pretend to be. No one can tell the difference.
10. Whistle.
11. Avoid sarcastic remarks.
12. Choose your life's mate carefully. From this one decision will come 90 per cent of all your happiness or misery.
13. Make it a habit to do nice things for people who will never find out.
14. Lend only those books you never care to see again.
15. Never deprive someone of hope; it might be all that they have.
16. When playing games with children, let them win.
17. Give people a second chance, always.
18. Be romantic.
19. Become the most positive and enthusiastic person you know.
20. Loosen up. Relax. Except for rare life-and-death matters, nothing is as important as it first seems.
21. Don't allow the phone to interrupt important moments. It's there for our convenience, not the caller's.
22. Be a good loser for your
loved ones.
23. Be a good winner of
Hearts.
24. Think twice before burdening a friend with a secret.
25. When someone hugs you, let them be the first to let go.
26. Be modest. A lot was accomplished before you were born.
27. Keep it simple.
28. Beware of the person who has nothing to lose.
29. Don't burn bridges. You will be surprised how many times you have to cross the same river.
30. Live your life so that your epitaph could read: "No Regrets!".
31. Be bold and courageous. When you look back on life, you will regret the things you didn't do more than the ones you did.
32. Never waste an opportunity to tell someone you love them.
33. Remember no one makes it alone. Have a grateful heart and be quick to acknowledge those who helped you.
34. Take charge of your attitude. Don't let someone else choose it for you.
35. Visit friends and relatives when they are in hospital; you need only stay a few minutes.
36. Begin each day with some of your favourite music.
37. Once in a while, take the scenic route.
38. Forgive quickly. Life is short.
39. Answer the phone with enthusiasm and energy in your voice.
40. Keep a note pad and pencil on your bed-side table. Million-dollar ideas sometimes strike at 3 AM.
41. Show respect for everyone who works for a living, regardless of how trivial their job.
42. Send your loved ones flowers. Think of a reason later.
43. Make someone's day by encouraging them.
44. Become someone's hero.
45. Marry only for love.
46. Count your blessings.
47. Compliment the meal when you are a guest in someone's home.
48. Wave at the children on a school bus.
49. Remember that 80 per cent of the success in any job is based on your ability to deal with people.
50. Don't expect life to be fair...

Sunday 8 January 2017

Paraprodsdokians

The first time I heard about paraprosdokians, I liked them.  Paraprosdokians are figures of speech in which the latter part of a sentence or phrase is surprising or unexpected and is frequently humorous. (Winston Churchill loved them.)

1. Where there's a will, I want to be in it.
 
2. The last thing I want to do is hurt you.... but it's still on my list.
 
3. Since light travels faster than sound, some people appear bright until you hear them speak.
 
4. If I agreed with you, we'd both be wrong.
 
5. We never really grow up.... we only learn how to act in public.
 
6. War does not determine who is right, only who is left.
 
7. Knowledge is knowing a tomato is a fruit. Wisdom is not putting it in a fruit salad.
 
8. To steal ideas from one person is plagiarism. To steal from many is research.
 
9. I didn't say it was your fault, I said I was blaming you.
 
10. In filling out an application, where it says, "In case of emergency, notify...." I answered, "a doctor."
 
11. Women will never be equal to men until they can walk down the street with a bald head and a beer gut, and still think they are sexy.

12. You do not need a parachute to skydive. You only need a parachute to skydive twice.
 
13. I used to be indecisive, but now I'm not so sure.
 
14. To be sure of hitting the target, shoot first and call whatever you hit the target.
 
15. Going to church doesn't make you a Christian, any more than standing in a garage makes you a car.
 
16. You're never too old to learn something stupid.

17. I'm supposed to respect my elders, but it's getting harder and harder for me to find one now.
 

Spread the Laughter,
Share the Cheer,
Let's Be Happy
While We're here!

Saturday 7 January 2017

भीम BHIM ऍप

१) भीम म्हणजे काय? : भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) असे या अॅपचे पूर्ण नाव आहे. UPI या पैसे पाठवण्याच्या पद्धतीशी जोडलेले असल्यामुळे याद्वारे पैश्यांचे व्यवहार सुरळीतपणे करता येणार आहेत.

२) कसे काम करते? : भीम अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती यात भरा. आपले बँक खाते UPI शी जोडले गेले असल्याची खात्री करून घ्या. खात्याची माहिती भरल्यानंतर त्वरित आपण पैश्याचे व्यवहार करू शकतो.

३) पैश्याचे व्यवहार कसे करायचे? : एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर जसे रोख रक्कम आपण देत असतो, त्याच प्रकारे भीम अॅपच्या सहाय्याने रक्कम पाठवायची आहे. रक्कम पाठवणाऱ्याची माहिती भरून सेंड म्हणल्यावर त्वरितच पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा होणार. पेटीएम सारखे यात पैसे आधी जमा करावे लागणार नाहीत.

४) QR कोड : भीम अॅपमध्ये QR कोडची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराच्या वेळी, माहिती न भारता फक्त QR कोडच्या स्कॅनिंगद्वारे पैसे पाठवणे शक्य होणार आहे.

५) व्यवहार मर्यादा : भीम अॅपद्वारे दिवसाला २० हजार रुपयांचे व्यवहार करता येणार आहेत. मात्र एका वेळी कमाल १० हजार रुपये पाठविण्याचीच मर्यादा घातली गेली आहे.

६) आवश्यक बाबी : भीम अॅप वापरण्यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन, इंटरनेट, बँक खाते, खात्याला UPI शी संलग्नित करणे आवश्यक आहे.

७) कोणकोणत्या बँक ‘भीम’ सेवा पुरविणार? : भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस तसेच एचडीएफसी बँक व इत्यादी  पहिल्या टप्प्यात भीम अॅप सेवा पुरविणार आहेत. तसेच अन्य बँकेत देखील केवळ IFSC कोडच्या माध्यमातून या सेवेला मान्यता मिळेल.

८) कोठे आहे ‘भीम’ उपलब्ध : भीम अॅप आपण अँडॉईड प्ले स्टोअर वरून तसेच अॅपलच्या अॅप स्टोअर वरुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतो.

९) भीम अॅपचे शुल्क : हे अॅप वापरण्यासाठी अथवा डाऊनलोड करण्यासाठी कोठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. भीम अॅपची सेवा पूर्णपणे मोफत आहे.

१०) कोणी तयार केले हे अॅप : भारतीय राष्ट्रीय भरणा कॉर्पोरेशन (एन. पी. सी. आय.) या संस्थेने ‘भीम’ अॅप तयार केले आहे. याचे संपूर्ण संचालन या संस्थेद्वारे केले जाईल. ही संस्था भारत सरकार द्वारे व्यवहार सुरळीततेकरिता चालविली जाते.

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?"
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.

हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.

जरा विरोधाभास पाहूया...

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
 हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.

काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.

'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..

हा आत्मविश्वास मुलांना द्या !

आवडली तर नक्की शेयर करा...!

तुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...

इंटरव्ह्यू

१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"

Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..

"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"

Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)

ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?

Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)

तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)

(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?

या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.

Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)

उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?

Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..

‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?

‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.

उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"

Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?

त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.

तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.!

Friday 6 January 2017

कालिदास

कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी  अतिथी आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि दुसर झाडं धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात.

कालिदास आता हतबल झाले,     

कालिदास म्हणाले मी हट्टी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नख आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले  आणि 

कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर  फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो. 

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले.

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.वाचनात आलेला ऐक सुंदर

Thursday 5 January 2017

फक्त तू खचू नकोस

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं ..?
कुणीतरी जिंकलंच की
हे ही नसे थोड ...
संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सूर्य रोजच उगवतो,
       त्याच  नव्या तेजाने ...
       रोज मावळतीला जातो
       रोजच्याच् नेमाने ...
       येणे जाणे रितच् इथली,
       हे तू विसरु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
प्रेम तुझ्यावर करणारे ,
कितीतरी लोक आहेत ...
तुझ्यासाठी जोडणारे ,
खुप सारे हात आहेत ...
अरे अशाच आपल्यांसाठी ,
तू ही थोड हसुन बघ ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       वाट तुझी बघत असतं,
       रोजच  कुणीतरी ...
       तुझ्यासाठी जगत असतं ,
       आस लावून प्रत्येक क्षणी ...
       त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
       अश्रु तू गाळु नकोस ...
       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...
उठ आणि उघडून डोळे ,
पहा जरा  जगाकडे ...
प्रत्येकाच्या आयुष्यात ,
काहीतरी असतेच् थोडे ...
नाही नाही म्हणून ,
उगाच कुढत तू बसु नकोस ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...
       सामर्थ्य आहे हातात जर, 
       स्वप्ने डोळ्यात घेऊन चल ...
       परिस्थितीशी भिडवून छाती,
       दोन हात करत चल ...
       विजय तुझाच असेल
       तेव्हा मागे वळून बघु नकोस ...

       आयुष्य खुप सुंदर आहे,
       फक्त तू खचु नकोस...

|| फक्त तू खचू  नकोस ||⁠⁠⁠⁠

Tuesday 3 January 2017

UPI

⁠⁠⁠UPI हि भानगड आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल .मी २ दिवसापासून थोडा अभ्यास केला आणि आता त्या बददल लिहितोय .तुम्हाला आवडेल आणि कामी येईल अशी सुविधा आहे . नक्की वाचा .

आपल्यापैकी बरेच जण Paytm ,Freecharge यांसारखे M Wallet (मोदींच्या भाषेत इ-बटवा) वापरत असतील.
या M Wallet चा मेन प्रॉब्लेम आहे कि यात पैसे टाकून आपल्याला खर्च करावे लागतात .आणि समोरचा विक्रेता आपल्याकडे असलेले M Wallet च वापरत असेल याचा काय भरोसा .अशा वेळी इच्छा असूनही आपण कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत मग शेवटी हात खिशाकडे वळतो.
भारतात युनिव्हर्सल वापरात असेल आणि ज्या अँप्स मधून कोणीही पैसे स्वीकारू शकतो किंवा घेऊ शकतो असं काहीतरी पाहिजे होतं असं वाटत  पण भारत सरकार ने  दिलेली UPI हि अशीच सुविधा भारतात जन्माला आली.जिच्याने कोणीही कोणालाही पैसे देऊ शकतो आणि घेऊ शकतो.

१. UPI म्हणजे काय ?
UPI (यूनिफाईड पायमेन्ट इंटरफेस) म्हणजे स्मार्टफोन च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवण्याची सोप्पी साधी पद्धत.(भारतात असलेली सर्वात सोपी पद्धत म्हटली तरी चालेल ) .हि सुविधा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या  सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्यादेखरेखी खाली चालतात .

२.एम वॉल्लेट आणि UPI मध्ये काय फरक आहे ?
M wallet खाजगी कंपन्या चालवतात . UPI हि सुविधा सरकार चालवते यात अँप खाजगी किंवा बँकांचे असू शकतात पण आपल्याला त्या अँप मध्ये पैसे टाकावे लागत नाहीत जे काही होते ते थेट Bank Accout ते Bank Account .
उदा. आपण Paytm वापरत असू आणि एखादा Paytm स्वीकारणाऱ्या चहावाल्याला आपल्याला पैसे द्यायचे असतील  तर आपल्याला आधी आपल्या बँक खात्यातून Paytm ला पैसे टाकावे लागतील मग त्याच्या paytm ला द्यावे लागतील . आणि वर त्याला त्याचे paytm चे पैसे बँकेत टाकायला १.५% रक्कम comission म्हणून द्यावी लागेल .
मात्र UPI मध्ये एवढं घुमावफिरावं नसतं . UPI चे सर्व व्यवहार हे मोफत असून UPI ला एकदा का आपण आपलं Credit किंवा Debit कार्ड link केलं कि आपल्या बँकेतून पैसे थेट समोरच्याच्या बँकेत पैसे टाकू शकतो .म्हणजे मध्ये कुठल्या wallet ची गरज नाही किंवा बँकेत पैसे येण्यासाठी कुठले commision देण्याची गरज नाही .

M Wallet  -   (ग्राहक) बँक ---Wallet ----Wallet ----बँक (विक्रेता )
UPI  -           (ग्राहक) बँक --------------------------------बँक (विक्रेता)

M wallet आणि UPI मधला मूळ फरक आणि महत्वाचा फरक हा आहे कि  स्मार्ट फोन वर असणाऱ्या कोणत्याही बँकेच्या UPI अँप वरून कोणत्याही बँकेच्या UPI अँप वर पैसे पाठवता येतात .यात M wallet  सारखे त्याच कंपनी चे अँप वापरण्याचे बंधन नसते.

३.UPI अँप कसे आणि कुठून डाउनलोड करायचे ?
UPI हि सुविधा सध्या भारतातल्या २१ बँका देतात . सोप्पे सांगायचे तर या २१ बँका एकमेकांमधले आर्थिक व्यवहार UPI च्या माध्यमातून निशुल्क करण्याची सुविधा देतात . या बँकांचे UPI अँप प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत .
प्ले स्टोर वरील UPI अँप्स च्या लिंक
TJSB Sahakari Bank Ltd's
TranZapp https://play.google.com/store/apps/details?id=in.co.finacus.tjsbbankpsp

हे अँप्स UPI अँप्लिकेशन सुविधा देतात .
यात आपण कोणत्याही बँकेचे खातेधारक असलो तरी देखील कोणत्याही बँकेचे UPI अँप वापरू शकतो .आणि कोणत्याही UPI अँप ने कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे टाकू शकतो .

४. UPI अँप कसे वापराल ?
मी जे अँप वापरतोय त्यावरून सांगतो . मी Tranzapp हे UPI अँप वापरतो.तसे UPI चे सर्वच अँप सारखे असतात फक्त बँके प्रमाणे अँप चे रंग बदलतात :D .कोणतेही upi अँप download केल्यावर पुढील प्रक्रिया कराव्या लागतात .
१.आपला बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो .
२. मग त्यावर  OTP येतो आणि आपला मोबाईल नंबर verify होतो .
३.आपली वैयक्तिक माहिती जसेकी नाव ,ई-मेल id हे द्यावे लागते . व आपल्या अँप्लिकेशन साठी एक ४ अंकी पासवर्ड  सेट करावा लागतो.
४.यानंतर आपल्याला आपला VPI म्हणजेच vertual payment ID सेट करावा लागतो . VPI म्हणजे  आपल्या बँक अकाउंट चा ई-मेल id च असतो . म्हणजे जगात ई-मेल ID हा केवळ एकमेव असतो तसा VPI हा जगात एकमेव असतो .जसेकी माझा VPI आहे mukul.phadnis@tjsb यातला tjsb म्हणजे TJSB Sahakari Bank Ltd तुम्ही ज्या बँकेचे UPI वापरणार त्याचा VPI तुम्हाला मिळेल जसेकी स्टेट बँकेचा वापरल्यास mukul.phadnis@sbi . VPI बद्दल पुढे सविस्तर सांगतो .   
५.यानंतर आपली UPI सेवा सुरु करण्यासाठी आपले खाते असलेली बँक निवडावी लागते.
६.तुमचा बँकेशी लिंक असलेला नंबर दिल्यामुळे तुमचे बँक खाते number दिसू लागतो .त्यावरच्या SET MPIN वर क्लिक करा .
७.या नंतर तुमच्या डेबिट कार्ड number चे शेवटचे ६ अंक आणि त्याची expiry date टाका .
८.या नंतर तुम्हाला OTP येईल . तो OTP टाका
९.व सुरक्षे साठी 4 किंवा 6 अंकी MPIN सेट करा. हा MPIN  ATM च्या पिन सारखा असतो .म्हणजे UPI अँप मधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी  हा पिन टाकल्या शिवाय त्या खात्यातून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही . 
१०. शेवटी successfully change pin असा मेसेज येईल . आणि तुम्ही
UPI सुविधेने व्यवहार करण्यास सुरवात करू शकाल .

या नंतर तूम्हाला पुन्हा हि प्रक्रिया कधीही करण्याची गरज नाही  फक्त तुमच्या अँप चा ४ अंकी पासवर्ड आणि तुमचा ४ किंवा ६ अंकी MPIN ह्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि गोपनीय ठेवाव्या लागतील .

५. UPI ने पैसे कसे द्याल ?
 UPI ने पैसे देण्याच्या ३ पद्धती आहेत .१.मोबाईल नंबर २.VPI ने ३.बँक अकाउंट नंबर ने .
send money व क्लिक केल्यावर हे तीनही पर्याय दिसतील.ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर UPI वर असेल तर मोबाईल नं वर किंवा समोरच्या कडे VPI असेल तर तो टाकून किंवा थेट बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC code टाकून पैसे थेट समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकता येतात .कमीत कमी १ रुपयापासून ते जास्तीत जास्त २ लाखापर्यंत रक्कम  UPI मधून पाठवता येते .

६.VPI-म्हणजे अकाउंट नंबर च छोटं नाव .? 
VPI हि एक गमतीशीर गोष्ट आहे . ज्यांना सारखा सारखा बँक अकाउंट नंबर सांगायचं कंटाळा येतो त्यांच्या साठी VPI हि एक सहज सोपी आणि गोष्ट आहे mukulphadnis@gmail.com हा जसा माझा ई-मेल आयडी याचा जगात कोणीही पुनर्वापर करू शकत नाही तसाच व्हर्चुअल पायमेन्ट आयडी असतो . हा एकदा ज्याचा झाला कि पुन्हा कोणाला तो घेता येत नाही .म्हणजे mukul.phadnis@tjsb नावाने आता कोणालाही VPI मिळणार नाही त्यासाठी  gmail ला करतो तास जुगाड म्हणजे mukul.phadnis143@tjsb @sbi @axis असं करावं लागेल . म्हणजे माझी ओळख हि माझीच राहील. हा VPI आपल्या बँक खात्याशी जोडला जातो म्हणजे जेव्हा कोणीही mukul.phadnis@tjsb या VPI वर पायमेन्ट करेल ते थेट माझ्या बँक खात्यात येईल . इतकं सोप्पं आहे . म्हणजे ना ifsc code सांगायची गरज ना बँक अकाउंट नंबर सांगायची गरज . यामुळे खाते क्रमांकाचा अवैध वापर होणे बंद होते  हा देखील एक फायदा असतो .

७.मुख्य प्रश्न . UPI किती सुरक्षित ?
मी आत्ताच एक आर्टिकल The Hindu  ला वाचलं त्यात हा प्रश्न होता .तर त्याचं उत्तर होतं
the security is ful-proof as the transaction will happen in a highly encrypted format. Already NPCI’s IMPS network handles more than Rs.8,000 crore worth of transactions a day, which will exponentially increase with the use of mobile phones..
म्हणजेच NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) हि  या आधी देखील दिवसाला ८ हजार कोटी online व्यवहार नियंत्रित करत होती अशी व्यवस्था किती सुरक्षित असते हे  आपणच समजून घ्यावे .

तसेच आता आधार कार्ड देखील UPI मार्फत जोडली जाऊन फक्त आधार कार्ड (नंबर) वरून बँक व्यवहार शक्य आहे.



मला वाटत कि तुम्हाला हि माहिती पुरेशी असेल मी सध्या हाच प्रयत्न करतोय कि देशात सुरु असलेल्या ह्या कॅशलेस अभियानाला हात भर कसा लावता येईल जेव्हापासून UPI हे तीन अक्षर ऐकायला आलेत सर्वांना कुतूहल होतं .आणि तुमचं निरसन झालं असेल असं समजतो . M wallet पेक्षा किती तरी जास्त सोयीची आणि सोप्पी प्रक्रिया UPI देतं जगात प्रत्येक देशाची एक payment सिस्टिम आहे . अमेरिकेकडे अँड्रॉइड आणि apple pay आहेत . चीन कडे त्यांची पायमेन्ट सिस्टिम आहे .आपल्या तंत्रज्ञानाच हे श्रेय आहे कि आपण आपली स्वदेशी आणि सुरक्षित अशी एक पायमेन्ट सिस्टिम बनवली आहे.भारतात एक युनिव्हर्सल पायमेन्ट सिस्टिम आली आहे .आणि हि शाश्वत आहे हे महत्वाचं .ऐकण्यात तर असही आलाय कि यामुळे M wallet बंद व्हायची वेळ येईल पुढच्या काही वर्षात . मुख्य म्हणजे हि सुविधा  सोपी आणि सरळ आहे . तुम्हीही तुमच्या डेबिट कार्ड च्या साहाय्याने UPI पायमेन्ट method सुरु करून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यास मदत करा  एवढेच आवाहन :)

Monday 2 January 2017

स्मशान माझा गुरु

 "भाकरीचं नातं घट्ट असतं. भिक्षेची भाकर वाटून खाल्ली आणि त्यावर मी जगले. तरुण आसल्यामुळे माझं वय हाच माझा धोका होता, जिवंत माणसांच्या कळपापेक्षा मला स्मशान अधिक सुरक्षित वाटायचं. मला माहीत होतं की, मेल्याशिवाय माणसं स्मशानात येत नाहीत आणि रात्री भुताच्या भीतीने तिथं कोणीच फिरकत नाही. कोणी जर चुकूनमाकून आलं तर मलाच भूत समजून पळ काढायचे. माझी सुरक्षा ही फक्त स्मशानानं केली आणि स्मशानानंच मला जगायला शिकवलं.
           स्मशानच माझा गुरु आणि आधार झालं. स्मशानात राहत असताना लोक गेले की, मी प्रेताच्या आगीजवळ बसून ऊब घेत असे. काही वेळा त्याच आगीवर भाकर भाजून घेत असे. मग माझा आणि त्या प्रेताचा एक अव्यक्त संवाद मनातल्या मनात व्हायचा.
           प्रेत मला सांगायचं, 'तु एकटी आहेस म्हणून का रडतेस ? माझ्याकडे बघ. मी एकटाच जळतोय आणि माझी मुलं घरी संपत्तीसाठी भांडत आहेत. आपण आलोही एकटेच आणि जाणारही एकटेच.' कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नही लेती."

          हे बोल आहेत...

     - सिंधुताई सपकाळ-
   जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
        ( अनाथांची माय )
 उ पवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला
असता.
..देव मनात ठेवा आणी एखाद्या उपाशी पोटी माणसाला खायला घाला.