Saturday 21 November 2015

रतन टाटा यांनी ट्विटरवर

नुकताच रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला.
मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे.
जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.
मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत.
तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना?
पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.
आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.
आम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.
‘हे पहा! आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही!’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले.
त्यातील एक महिला फारच चिडली.
तिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला
'जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’
एका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे.
असे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.
अमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.
आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.
आपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटते?

No comments:

Post a Comment